Naav 2...
Naav...2 भंगलेल्या त्या नावेला नावाड्याने पुन्हा जन्म दिला , जगण्याचा नवा उद्देशहि त्याने तिला समजावून सांगितला , त्याने समजावले कि " तू अशी नव्हतीसच कधी,अशा कित्तेक सागरातून आणि सरोवरातून तू प्रवास केलास ,पण ते तुला भुरळ घालु शकले नाहीत , कारण ते तुझे खंबीर आणि उदात्त विचार , महान आदर्श ! , संकटांकडे तू नेहमी एक खेळ म्हणूनच बघत आलीस , कधीच अशा गोष्टीत गुरफटली नाहीस , परंतु वय , होय ते वयच तुझा तोल जायला करणी भूत ठरलं . आता विसर ते सर्व आणि नव्याने ध्येय बनव . " "सागराला ध्येय नाही तर ध्येय कडे जाण्याचा मार्ग बनव !" तुझी स्वप्न वेगळी आहेत अशा मृगजळाचा मागे धावून स्वतःचा मार्ग चुकवू नकोस... हे सर्व समजून सावरली ती , सर्व मागे टाकून पुढे जाण्याचा निश्चय करून ,आता कुठे सावरली होती . आधी सागरच नाव घेताच उंच भरारी घेणार तीच मन , आता फक्त तिची नजर जमिनीवर आणून ठेवत होत. चेहऱ्या वरच ते सुंदर हास्य कधीच मावळलं होत . तिचा चेहेऱ्यावर एक हसू उमटत होत ते हि "उपहासित " ! ,कारण तीच सागरच वेडच सर